सामाजिक

प्रांत कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा !

  • खवसावाडीच्या रस्त्यासाठी वापरलेला सुमारे ६० लाख रुपयांचा रस्ता शोधून द्या, अन्यथा रस्त्यासाठीचा निधी कुठे गेला याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि रा.जि.प. बांधकाम उपविभाग पेणचे अभियंत्यांवर कारवाई करा.
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर पेण ते खवसावाडी ह्या रस्त्याचे कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग पेण येथील अभियंतांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. 
  • पाचही आदिवासी वाड्यांना वन हक्क कायदा २००६ अन्वये ३/१ वैयक्तीक व ३/२ नुसार सार्वजनिक जमिनीसाठी प्रस्ताव तयार करण्यात यावे. 
  • उंबरमाळ येथे समाज मंदिर व अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावे.
  • वरची तांबडी येथे समाज मंदिर व सभा मंडप बांधण्यात यावे.
  • वरची तांबडी, खालची तांबडी आणि खवसावाडी येथे अंतर्गत रस्ते बनविण्यात यावे. 
  • पेण तहसील कार्यालयात आदिवासी बांधवांचे सुमारे ३५० जातीच्या दाखल्यांचे अर्ज मागील एक वर्षांपासून पडून आहेत ते मंजूर करण्यात यावे जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. 
  • उंबरमाळ आदिवासीवाडी येथील जि.प.प्राथमीक शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीस आली असून अशा धोकादाय इमारतीमध्ये १ ली ते ४ थी ची मुले शिक्षण घेत आहेत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी शाळेची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.
  • पेण ते उंबरमाळ, केळीची वाडी ह्या रस्त्यास मंजूर तीस लाख रुपये निधी ची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि रा.जी.प. बांधकाम उपविभाग पेण अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
  • ग्रुप ग्रामपंचायत दुष्मि -खारपाडा हद्दीतील खैरासवाडी आदिवासी वाडीच्या आजूबाजूला असलेल्या बेकायदेशीर दगड खाणी आणि स्टोन क्रशर्समुळे आदिवासींच्या घरांना तडे जात असून आणि होणारे ब्लास्टिंग आणि धुळीमुळे आदिवासी बांधवांचे जगणे मुश्किल झाले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह खनिज कर्म विभागाला लेखी तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने संबंधित महसूल विभागाचे अधिकारी व बेकायदेशीर दगड खाणी आणि स्टोन क्रशर्स चालवणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे.
  • खारपाडा-सावरोली राज्यमार्ग ते खैरासवाडी आदिवासी वाडी चा रस्ता तात्काळ बनवण्यात यावा. 
  • खारपाडा-सावरोली राज्यमार्ग ते वडमालवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्यात सत्ता बनविण्यात यावा.
  • वडमालवाडी येथील जल जीवन मिशन योजनेस वाढीव निधीची उपलब्धता तात्काळ करण्यात यावी.
  • मालवाडी आदिवासी वाढीचा रस्ता तात्काळ तयार करण्यात यावा.
  • शहापाडा धरणवाडीला गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबविण्यात यावी या सारख्या आदिवासी नागरिकांच्या मागण्यांसाठी बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दांडाधिकारी पेण यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बिरसा ब्रिगेड संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाघमारे आणि पेण तालुकाध्यक्ष जितेंद्र वाघमारे यांनी दिली.
error:Content is protected !!